शनिवार, १२ जून, २०२१

सांगावे, कवण्या ठाया जावे, कवणा ते स्मरावे,


सांगावे, कवण्या ठाया जावे, कवणा ते स्मरावे,

कैसे काय करावे, कवण्या परि मी रहावे |

कवण येउन, कुरुंद-वाडी, स्वामी ते मिळवावे, सांगावे ||धृ||

या हारि, जेवावे व्यवहारी, बोलावे संसारी, 

घालूनी अंगिकारी, प्रतीपाळीसि जो निर्धारी,

केला जो निज निश्चय स्वामी कोठे तो अवधारी, सांगावे ||१||

या रानी, माझी करुणावाणी, काया कष्टील प्राणी,

ऐकुनी घेशील कानी, देशील सौख्य निदानी,

संकट होउनि, मूर्च्छित असता, पाजील कवण पाणी, सांगावे ||२||

त्यावेळा, सत्पुरुषांचा मेळा, पहातसे निज डोळा,

लावति भस्म कपाळा, सांडी भय तू बाळा,

श्रीपाद श्रीवल्लभ म्हणती, अभय तुज गोपाळा, सांगावे ||३||

*********:

नारायण स्वामींचे शिष्य गोपाळ यांनी लिहलेले पद.

गुरूविरहाने कासाविस झालेल्या शिष्याचे हे मनोगत आहे.

हे गु्रुदेव मला सांगा मी  कुठे जावू.कुणाला स्मरू.काय करू. कसे राहू। कसे येवून कुरुंदवाडीला स्वामीला भेटू.मिळवू . (नरसोबा वाडी)

याजगात संसारात व्यवहारी जगण्यात खाणे पिणे उठणे निजणे हे घडतच आहे.पण मला आपल्या जवळ घेवून माझा भार  उचलणारा, पालन करणारा, तसे वचन देणारा स्वामी कुठे आहे?

मी या संसार रूपी अरण्यात अडकलो आहे.आणि अतिशय दु खीकष्टी झालो आहे .      दु:खात मी रडत आहे ,ओरडत आहे, हाका मारत आहे ही माझी करूणावाणी कोण ऐकेल   ?आणि मला सुख देईल. दु खाने, तहानेने मी मुर्छित होऊन, बेशुद्ध होऊन पडलेलो असताना मला येऊन कोण बरे पाणी पाजील?

त्याचवेळी मी सत्पुरुषांचा समूह या माझ्या डोळ्यांनी पाहिला ते जवळआले त्यांनी माझ्या कपाळाला भस्म लावले आणि सांगितले हे गोपाळा  तू भय सांडून दे.

हे सत्पुरुष म्हणजे साक्षात श्रीपाद श्रीवल्लभ होते .त्यानी या गोपाळला अभय दिले.

 

शुक्रवार, ४ जून, २०२१

दत्ता मजला प्रसन्न।होसी जरी तू वर देसी


दत्ता मजला प्रसन्न।
होसी जरी तू वर देसी ।।
तरी आनन मागेतुझसी ।
निर्धारूनि मानसी ।।धृ।।

स्मरण तुझे मज नित्य असावे ।
भावे तव तव गुण गावे.।।
अनासाक्तीने मी वागावे ।
ऐसे मन वळवावे ।।१।। 

सर्व इंद्रिये आणि मन हे 
तुझे हाती आहे ।
यास्तव आता तू लवलाहे
स्वपदी मन रमवावे ।।२।।
 
विवेक आणि सत्संगती हे 
नेत्रव्दय बा आहे ।
वासुदेव निर्मळ देहे 
जेणे त्वपदी राहे. ।।३।।
दत्ता मजला प्रसन्न होसी ---