गुरुवार, ७ मार्च, २०१३

कोठडी- स्वातंत्र्यवीर सावरकर



अंदमानात कैद्यांना स्वत:ची कोठडी स्वत:च साफ करावी लागे. ती साफ करतांना तात्यांच्या मनात आलेले विचार या कवितेतून त्यांनी मांडले.

 "लिंपुनि शिंपुनि जें । कायतरी
सजविसी दिवस भरी
बंदि मंदिर तें। एकादा
महाल वा सोनेरी?"
अजि नचि केवल या। बंदिच्या
भिंति त्या भुयारांच्या
रक्षिति अवसेसी। माझ्या ज्या
पासुनिया पुनवेच्या
"तरि रे कोठडीच्या। या कृरा
भिंति तोडुंची रे धीरा
झटशील तरी होई। न क्वचित का
पूर्ण मुक्तता शक्या?
पूर्णा? अजि ना ना । मातीच्या
भिंति भंवति या साच्या
दगडी भिंती दुज्या!
"आशा सोडिना या जगतीं
दगडांच्याही या भिंती
धुळीला रे मिळती
तटहि किती
तडकूनिया तुटती!"
तरिही काय? अहो । आंशिक ती
शक्य "पूर्ण" ना मुक्ती
या तटांपुढती। बंदिच्या
क्षितिजांच्याही भिंती!
"परिसूं परि आम्ही । कुणीकुणी
त्याही ओलांडोनी
वृत्तींच्या क्षितिजा । वरिलीची
पूर्ण मुक्तता त्यांनी!"
रंगात उषेच्या आणी । सांजेच्या
चित्रिलें विश्वकर्म्यानें। ज्या साच्या
आकाश छता त्या। "मी"च्या। हलक्यांच्या
हंसू-असूंच्या या। झोपाळ्या
वरतीचि झुलत तया
पाहत होतों कीं। होतें जों
दिसत तोवरीं तरि त्यां!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा